Thursday, 30 April 2020

१महाराष्ट्र दिन

●●┄─┅━━♍💲🅿━━┅─┄●●
●══════════════════●
*🛑 1 मे महाराष्ट्र / कामगार दिन  🛑*
●══════════════════●
*१ मे हा दिवस “ महाराष्ट्र दिन ” आणि            “ जागतिक कामगार दिन ” म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. तर कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन म्हणून दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.*
*1 मे महाराष्ट्र दिन / कामगार दिनानिमित्ताने वाचनीय माहिती pdf स्वरूपात....* ●══════════════════●
*🛑●-*

Sunday, 7 October 2018

मुलांना काय घडवताय

*मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?*

माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

Tuesday, 5 September 2017








*नमस्कार*
*शिक्षणासारख्या*
*पवित्र क्षेत्रात कार्यरत*
*राहून , राष्ट्रबांधणी व देशाचे*
*भावी आधारस्तंभ घडविणा-या.'*
*माझ्या सर्व शिक्षक बांधवांना*
*शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*.

    *आपला स्नेहांकित*

        *प्रविण  सांगळे*


Tuesday, 15 August 2017

जय हिंद



🚩🇮🇳॥ वन्दे माँ भारती ॥🇮🇳🚩
🇮🇳
जय वन्दे माँ~जय माँ भारती ,
माँ~माँ मै तेरी उतारू आरती ।
मिलेंगे सौ जनम चरणों में तेरे !
फिर भी नही उपकार की पूर्ती ।।धृ।।
🇮🇳
पुजा में झिलमिल सितारे लाऊ ,
क्षितिज सूरज का दिया बनाऊ ।
पूनम चांद तिलक भाल लगाऊ ,
गले में सतरंगी इंद्रधनू पहनाऊ ।
माँ भारती जब हो तेरी आरती ,
आयेंगी भक्तों की सागर भरती ।।१।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ शानसे सिंह पे तुमे बिठाऊ ,
दौड़में चितेकी रफ़्तार दिलाऊ ।
सिरपे मोरपंखी मुकूट पहनाऊ ,
कोयल गलेसे भजन गीत गाऊ ।
जय माँ~जय माँ~जय भारती ,
खुशियों में नाचे आसमां धरती ।।२।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ भारती माँ गंगाजी में नहाये ,
पग से गंगाजल पावन हो जाये ।
माँ तेरी तिरंगी मखमली चुनरी ,
गगन में वायु संग सदा लहराये ।
हम हिन्दुस्तानी उतारेंगे आरती ,
माँ भारती है भारत की सारथी ।।३।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
हिरेमाणिक मोतीमणी पहनाऊ ,
चहुंओर कस्तूरी सुगंध फैलाऊ ।
माँ भारती तेरी मै महिमा गाऊ ,
तेरे चरण में सदा शिश झुकाऊ ।
शुर विर संतानों की है ये धरती ,
भारतके शेर करे माँ की आरती ।।४।।
मिलेंगे सौ जनम.....!
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, 7 August 2017

बहिण

         

                 *।।बहिण।।*
             〰〰?〰〰
        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄

Wednesday, 26 July 2017

कारगील विजय दिवस

कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारत के लिये एक महत्वपूर्ण दिवस है। इसे हर साल 26 जुलाई को मनाया जाता है। कारगिल युद्ध लगभग 60 दिनों तक चला और 26 जुलाई को उसका अंत हुआ। इसमें भारत की विजय हुई। इस दिन कारगिल युद्ध में शहीद हुए जवानों के सम्मान हेतु मनाया जाता है।
   1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।

Wednesday, 14 June 2017

स्कूल चले हमस्कूल चले हम

स्कूल चले हमस्कूल चले हम

सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा

झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा

कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे

देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे

सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या

भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे

सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी

      समस्त शिक्षक

सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा

झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा

कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे

देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे

सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या

भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे

सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी

      समस्त शिक्षक

Monday, 12 June 2017

*येतील चिमण पाखरं'*

*येतील चिमण पाखरं'*

26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट    घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।

Tuesday, 6 June 2017

छत्रपती शिवाजी महाराज की जय !

#‎अवघा‬ "मराठा छत्रपती" झाला

#6 जून 1674 पाच सुलतानी सत्तेच्या छाताडावरती पाय देऊन माझा राजा छत्रपती झाला......

दरबार सज्ज झालाय थोरल्या..
धन्याच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी..

#६_जून.
#शिवराजाभिषेकदिन
#किल्ले_रायगड
# जय जिजाऊ
#जय शिवराय
#जय शंभूराजे

Friday, 2 June 2017

संघर्षकारी लोकनेत्यास विनम्र अभिवादन





देवा........!
            जीवनात सर्वस्व आहात तुम्ही.....!
😭 😭

        3 जून 2014 रोजी दिवस उजाडला आणि असंख्य सामान्य लोकांच्या व हिंदुस्थान चा सूर्य मावळला......!
                     साहेब आजचा दिवस आयुष्यात आला आणि पूर्ण आयुष्यचं इथं थांबलं हृदय धडकत आहे पण ते त्या दिवसापासून मेलेलंच आहे.....!
                        साहेब 3 जून 2014 ते 3 जून 2017 या काळातील असा एकही दिवस नाही की जो आपला आशिर्वाद घेतल्याशिवाय दिवस गेला नाही आणि या शरीरात जो पर्यंत प्राण आहेत तोपर्यंत देखील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाचाच जप करतील....!
                    साहेब नेहमी आपल्या आठवणीत स्वप्न रंगायची भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलोत तरी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे आहेत हीच ओळख आम्हाला पूर्ण आयुष्य मिळाली साहेब भारताच्या इतिहासात आपलं जे स्थान आहे ते छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या पंक्तीत व असंख्य सामान्य मागासलेल्या दिनदुबळ्या कष्टकरी शेतमजुरांच्या हृदयात देवाचं स्थान निर्माण केलं साहेब तुम्ही आमच्यात नाहीत हे हृदय कधीच मान्य करायला तयार नाही.......!
           प्रत्येक मंदिरात गेलो तरी त्या प्रत्येक देवात फक्त एकच देव दिसतो आणि ते म्हणजे आमचे लाडके साहेब...........!
               साहेब असंख्य सामान्य लोकांच्या घरात तुम्हाला शान शोकाच्या कोणत्या गोष्टी दिसायच्या नाहीत संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची देखील टंचाई दिसेल साहेब एवढंच नाही पोट भरण्यासाठी लागणारं अन्न - पाणी देखील एक वेळेस दिसायचं नाही पण त्या घरांमध्ये आणि प्रत्येक घरांच्या देवघरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ( देवाचा ) फोटो नक्की पहायला मिळेल....!
                                                                      साहेब आपल्या आठवणीत प्रत्येक दिवशी डोळ्यात अश्रू येणं आणि अंतःकरणाला चिरून टाकणाऱ्या आपल्या आठवणी नेहमीच पावलोपावली हृदयात घर करून गेल्या....!
                             .............

साहेब.....
             काय केला गुन्हा आम्ही
              कश्याची दिलीत सजा ......!
             बुद्धिबळाच्या पटावरून
          आमचा राजाच झालाय वजा...!
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

        लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ( देवाला ) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन .....!
                     😭💐💐💐💐💐💐💐💐💐सदैव स्मरनाथीॅ -
 तालुका अध्यक्ष स्वाभिमानी प्रबोधनी शिरूर कासार 💐😭

Tuesday, 30 May 2017

🌻🌼🌻🌼🌻🌼🌼

   *पुण्यश्लोक राजमाता*
          *महाराणी*
   *अहिल्यादेवी होळकर*
             *यांच्या*
*२९२ व्या जयंतीनिमित्त*
     *विनम्र अभिवादन!!*

🌼🌻🌼  🌼🌻🌼

Saturday, 13 May 2017

१४ में संभाजी राजे जयंती

मरणाला घाबरणारे खुप बघीतले,
मरणाला न घाबरणारेही खुप बघीतले,
 पण....
मरणालाच घाबरवणारा एकच बगीतलाय
*राजा शंभु छञपती*
१४ में संभाजी राजे जयंती
हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना त्रिवार
*मानाचा मुजरा*

Wednesday, 10 May 2017

🌺🍃   बुद्ध पौर्णिमा 🍃🌺

        आज बुधवार, दि. १० मे, २०१७ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा मे महिन्यात येते. या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.
     महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : "पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते." "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. "सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
     लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली, आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
      शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.
       पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरूवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतमास वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
      याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.
      या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला
      गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात.
      अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे.
     सणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात.
      बुद्धाने आयुष्यभर शील, समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला. त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला.
     सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे. या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. जेव्हा आपण प्रसन्नतेने अष्टशीलाचे पालन करतो, तेव्हा भूतकाळात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना शील व समाधीचा जास्तीत जास्त धैर्याने अभ्यास करण्याची प्रेरणा  आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचरणाने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
      - तथागत  भगवान गौतम बुद्ध
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

 *सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगल सदिच्छा !!!*
"सर्वांचे कल्याण होवो."
💐💐🙏🙏🙏💐💐
🌺🌺🌺जयहिंद🌺🌺🌺
*💐अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा,शांती ची शिकवण देणारे, विश्व वंदनीय महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त*💐
*२५६१ व्या बुध्द पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय हार्दिक सदिच्छा*....!!💐

Wednesday, 3 May 2017

निट वाचा आणि विचार करा

मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी?

निट वाचा आणि विचार करा

दहा-पंधरा वर्षांपूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावांतही सुरू झाल्या. इंग्रजी शाळांचे पेव आत्ता खेड्यापाड्यातही पसरले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम सरकारी मराठी शाळांवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या इंग्रजी शाळांना पळवून नेत आहेत. पालकांची इच्छा नसेल, तरीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून, त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. याउलट, सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असते. तरीही ग्रामीण भागांतील पालकों इंग्रजी शाळांवरील लक्ष अजूनही कमी झालेले नाही.

'दुरुन डोंगर साजरे' या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकांना आकर्षित करतात. पण त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणांमुळे एक-दोन वर्षांत ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, वह्या आणि इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घालतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक, शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच! त्यामुळे मुले गोंधळून जातात. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते.

दोन वर्षे इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेव्हा मराठी शाळांत प्रवेश घेतात, तेव्हा ते गोंधळून जातात. पालकांनी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेत त्यांना शाळेत प्रवेश घेऊन द्यायला हवा. काही मुले खूप हुशार असतात. काहीही सांगितले, तरीही त्याचा लगेच स्वीकार करतात आणि त्यात प्रगतीही करतात. ज्या प्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलही वेगळे असते.

'शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो, त्याच शाळेत आपलाही मुलगा जावा' असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भवितव्याची काळजी करतात, ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. 'फाडफाड इंग्रजी बोलता आले, की आयुष्यात यश मिळते' हा साफ चुकीचा समज आहे. पण सध्या असा समज प्रत्येक घरात आहे. घरातलं मूल 'रेन रेन, कम अगेन' म्हणालं, की आई-वडिलांची छाती अभिमानाने भरून येते. 'लेकरू इंग्रजी गाणे म्हणत आहे' म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो का? तर उत्तर आहे 'नाही'! त्याच्या शाळेतील 'मिस'ने ज्या हावभावाने ते गीत शिकवलेले असते, त्याच हावभावाने ते मूल गाणे म्हणते. त्याचा अर्थ त्याला माहीत नसतो. याउलट मराठीत, म्हणजे आपल्या मातृभाषेत 'येरे येरे पावसा' म्हणताना त्याला हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतींतही घडत असते. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून होणे प्रगतीसाठी आवश्‍यक आहे.

एखाद्या विषयाचा गाभा किंवा मूळ संकल्पना कळाली, तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते. पण मूळ संकल्पनाच कळाली नाही, तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्याने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तीस भरपूर चालना मिळते. तसेच, स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच, मराठीत जे बोलले, तसेच लिहिले जाते; पण इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते. त्यामुळेही मुलांना गोंधळून जायला होते. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचमुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही, तर वैतागतात, निराश होतात; तर काही मुले व्यसनाधीन होतात.

इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तुटपुंजा पगार असतो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ते खासगी शिकवणी घेण्याकडे वळतात, त्याचा खर्च वेगळाच! काही इंग्रजी शाळा याला अपवाद असतीलही; पण हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्‍याच..

विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगलीही आहे आणि वाईटही! चांगली एवढ्यासाठी, की काही दु:खद गोष्टी विसरून गेलो, तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट स्मृतीत राहिली असती, तर माणूस नक्कीच पागल झाला असता; म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र, जे स्मृतीत राहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो, ते मात्र काही काळानंतर विसरून जातो, हे आपल्यासाठी हे आपल्यासाठी वाईट आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही; मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्‍यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळीही अभ्यासात मदत करू शकतात, काही चुकले असेल तर मार्गदर्शनही करत असतात. मात्र, इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलटे घडते. मुलांना शाळा आणि ट्युशन याच गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी वाचता येत नाही, तर ते मुलांना काय सांगू शकतील? 'तुझ्या शिक्षकांनाच विचार' असे उत्तर त्यांना मुलांना द्यावे लागते. येथूनच मग मुलांचा-पालकांचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी खाडखाड बोलतील; पण मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांसारखे आपले स्वत:चे मनोगत व्यक्त करू शकणार नाही. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो.

सध्या सगळीकडे शाळांच्या प्रवेशाचे काम सुरू झाले आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, की पालकांना नंतर काहीही करता येत नाही. म्हणून 'आपल्या पाल्याला कोठे प्रवेश द्यावा' याविषयी पालकांचे आताच प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्‍चाताप होणार नाही. पालकांनी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे; मगच योग्य वाटेल, तिथे मुलांना प्रवेश द्यावा..

सौजन्य दैनिक सकाळ

साभार - https://www.facebook.com/Mymarathischool/

Thursday, 27 April 2017

अक्षय तृतीया

*अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!*
*आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो* .
*येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून  येवोत*
*अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!* 🙏🌹🙏



शुभेच्छुक ---प्रविण सांगळेसर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹