Tuesday, 30 May 2017

🌻🌼🌻🌼🌻🌼🌼

   *पुण्यश्लोक राजमाता*
          *महाराणी*
   *अहिल्यादेवी होळकर*
             *यांच्या*
*२९२ व्या जयंतीनिमित्त*
     *विनम्र अभिवादन!!*

🌼🌻🌼  🌼🌻🌼

Saturday, 13 May 2017

१४ में संभाजी राजे जयंती

मरणाला घाबरणारे खुप बघीतले,
मरणाला न घाबरणारेही खुप बघीतले,
 पण....
मरणालाच घाबरवणारा एकच बगीतलाय
*राजा शंभु छञपती*
१४ में संभाजी राजे जयंती
हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना त्रिवार
*मानाचा मुजरा*

Wednesday, 10 May 2017

🌺🍃   बुद्ध पौर्णिमा 🍃🌺

        आज बुधवार, दि. १० मे, २०१७ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा मे महिन्यात येते. या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.
     महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात केले आहे. ते लिहितात : "पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते." "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. "सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
     लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणा-या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वा-याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली, आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
      शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.
       पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५ व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरूवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतमास वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंधःकार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक संबुद्ध झाला. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
      याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.
      या पौर्णिमेच्या रात्री तिस-या प्रहरी मनाच्या जागरूक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला
      गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्वप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस त्रिगुणी पौर्णिमा असे म्हणतात.
      अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे.
     सणांच्या दिवशी मंगल, सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची स्मृती जपण्यासाठी सण साजरे केले जातात. सणांच्या दिवशीच्या भूतकाळातील घडामोडींपासून बोध घेऊन त्यानुसार स्वतःचे जीवन घडविण्यासाठी सण साजरे केले जातात.
      बुद्धाने आयुष्यभर शील, समाधी व प्रज्ञेचा मार्ग शिकविला. त्याने करूणा विकसित करण्याचा व समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यावर आधारित जीवन जगण्याचा धडा लोकांना दिला.
     सर्व बारा पौर्णिमा बौद्धांचे सण आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. बुद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळे असे महत्व आहे. या सर्व दिवशी उपोसथ म्हणजेच अष्टशीलाचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. जेव्हा आपण प्रसन्नतेने अष्टशीलाचे पालन करतो, तेव्हा भूतकाळात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना शील व समाधीचा जास्तीत जास्त धैर्याने अभ्यास करण्याची प्रेरणा  आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्व समजून घेणे आवश्यक आहे.

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचरणाने,
लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
      - तथागत  भगवान गौतम बुद्ध
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

 *सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगल सदिच्छा !!!*
"सर्वांचे कल्याण होवो."
💐💐🙏🙏🙏💐💐
🌺🌺🌺जयहिंद🌺🌺🌺
*💐अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा,शांती ची शिकवण देणारे, विश्व वंदनीय महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त*💐
*२५६१ व्या बुध्द पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय हार्दिक सदिच्छा*....!!💐

Wednesday, 3 May 2017

निट वाचा आणि विचार करा

मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी?

निट वाचा आणि विचार करा

दहा-पंधरा वर्षांपूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावांतही सुरू झाल्या. इंग्रजी शाळांचे पेव आत्ता खेड्यापाड्यातही पसरले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम सरकारी मराठी शाळांवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या इंग्रजी शाळांना पळवून नेत आहेत. पालकांची इच्छा नसेल, तरीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून, त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. याउलट, सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असते. तरीही ग्रामीण भागांतील पालकों इंग्रजी शाळांवरील लक्ष अजूनही कमी झालेले नाही.

'दुरुन डोंगर साजरे' या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकांना आकर्षित करतात. पण त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणांमुळे एक-दोन वर्षांत ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, वह्या आणि इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घालतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक, शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच! त्यामुळे मुले गोंधळून जातात. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते.

दोन वर्षे इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेव्हा मराठी शाळांत प्रवेश घेतात, तेव्हा ते गोंधळून जातात. पालकांनी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेत त्यांना शाळेत प्रवेश घेऊन द्यायला हवा. काही मुले खूप हुशार असतात. काहीही सांगितले, तरीही त्याचा लगेच स्वीकार करतात आणि त्यात प्रगतीही करतात. ज्या प्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलही वेगळे असते.

'शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो, त्याच शाळेत आपलाही मुलगा जावा' असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भवितव्याची काळजी करतात, ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. 'फाडफाड इंग्रजी बोलता आले, की आयुष्यात यश मिळते' हा साफ चुकीचा समज आहे. पण सध्या असा समज प्रत्येक घरात आहे. घरातलं मूल 'रेन रेन, कम अगेन' म्हणालं, की आई-वडिलांची छाती अभिमानाने भरून येते. 'लेकरू इंग्रजी गाणे म्हणत आहे' म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो का? तर उत्तर आहे 'नाही'! त्याच्या शाळेतील 'मिस'ने ज्या हावभावाने ते गीत शिकवलेले असते, त्याच हावभावाने ते मूल गाणे म्हणते. त्याचा अर्थ त्याला माहीत नसतो. याउलट मराठीत, म्हणजे आपल्या मातृभाषेत 'येरे येरे पावसा' म्हणताना त्याला हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतींतही घडत असते. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून होणे प्रगतीसाठी आवश्‍यक आहे.

एखाद्या विषयाचा गाभा किंवा मूळ संकल्पना कळाली, तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते. पण मूळ संकल्पनाच कळाली नाही, तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्याने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तीस भरपूर चालना मिळते. तसेच, स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच, मराठीत जे बोलले, तसेच लिहिले जाते; पण इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते. त्यामुळेही मुलांना गोंधळून जायला होते. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचमुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही, तर वैतागतात, निराश होतात; तर काही मुले व्यसनाधीन होतात.

इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तुटपुंजा पगार असतो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ते खासगी शिकवणी घेण्याकडे वळतात, त्याचा खर्च वेगळाच! काही इंग्रजी शाळा याला अपवाद असतीलही; पण हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्‍याच..

विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगलीही आहे आणि वाईटही! चांगली एवढ्यासाठी, की काही दु:खद गोष्टी विसरून गेलो, तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट स्मृतीत राहिली असती, तर माणूस नक्कीच पागल झाला असता; म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र, जे स्मृतीत राहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो, ते मात्र काही काळानंतर विसरून जातो, हे आपल्यासाठी हे आपल्यासाठी वाईट आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही; मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्‍यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळीही अभ्यासात मदत करू शकतात, काही चुकले असेल तर मार्गदर्शनही करत असतात. मात्र, इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलटे घडते. मुलांना शाळा आणि ट्युशन याच गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी वाचता येत नाही, तर ते मुलांना काय सांगू शकतील? 'तुझ्या शिक्षकांनाच विचार' असे उत्तर त्यांना मुलांना द्यावे लागते. येथूनच मग मुलांचा-पालकांचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी खाडखाड बोलतील; पण मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांसारखे आपले स्वत:चे मनोगत व्यक्त करू शकणार नाही. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो.

सध्या सगळीकडे शाळांच्या प्रवेशाचे काम सुरू झाले आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, की पालकांना नंतर काहीही करता येत नाही. म्हणून 'आपल्या पाल्याला कोठे प्रवेश द्यावा' याविषयी पालकांचे आताच प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्‍चाताप होणार नाही. पालकांनी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे; मगच योग्य वाटेल, तिथे मुलांना प्रवेश द्यावा..

सौजन्य दैनिक सकाळ

साभार - https://www.facebook.com/Mymarathischool/

Thursday, 27 April 2017

अक्षय तृतीया

*अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!*
*आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो* .
*येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून  येवोत*
*अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!* 🙏🌹🙏



शुभेच्छुक ---प्रविण सांगळेसर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, 11 April 2017

विद्येविना मती गेली...।
मतिविना नीती गेली...।
नीतिविना गती गेली...।
गतिविना वित्त गेले...।
वित्ताविना शूद्र खचले...।
 इतके
अनर्थ एका अविद्येने केले...।
.
.
.

राष्ट्रपिता क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले
यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..

Thursday, 6 April 2017

पालकसंजीवनी

👨‍👩‍👧पालकांसाठी थोडं महत्वाचं.👨‍👩‍👧‍👦

एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
          घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
          एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
          इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
          त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
          आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."

          आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.

(मराठीमध्ये अनुवादीत)

Monday, 3 April 2017

!!जय श्री राम!!



राम जिनका नाम है,
अयोध्या जिनका धाम है,
ऐसे रघुनंदन को,
हमारा प्रणाम है,
आपको और आपके परिवार को,
राम नवमी की
हार्दिक शुभकामनाये !

🚩जय श्रीराम 🚩

🚩 *जय श्री राम* 🚩

राम
राम
|    राम
|         राम
|              राम
|                  राम
|                     राम
|                         राम
|                            राम
|                               राम
|                                राम
|                                 राम
|                                राम
|                              राम
|                           राम           " ,,
ॐराम राम राम राम राम राम राम राम ॐ
|                           राम           ,, "
|                              राम
|                                राम
|                                 राम
|                                 राम
|                                 राम
|                              राम
|                           राम
|                        राम
|                     राम
|                 राम
|             राम
|         राम
|    राम
राम
राम
🚩 *जय श्री राम*  🚩

!!जय शिवराय !!



*भारताचे भाग्यविधाते विश्ववंदनिय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवराय*

*त्रैलोक्य पोरका झाला*......
*रयतेचा वाली गेला* .
*माँ, बहन की इज्जत करनेवाला शिवराय निमाला*.

*ऎ अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना*
*तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है* :------ औरंगजेब

परकीय ,परधर्मीय शत्रुच्या मुखातून सुध्दा माझ्या राजाबदल असे गौरवोद्गार निघाले .

कारण, *भारताच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या व थरारक क्रांतिपर्वाचे जनक कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होत*.
त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना त्रिवार मुजरा...!!"🙏🏼🙏🏼

-- *3 एप्रिल 1680* --
💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏