पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- शामची आई- गोष्टी mp3
- स्वच्छतेची घोषवाक्य
- फळांची नावे (Flash cards)
- वाशिम जिल्हा
- बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती
- गणित क्लृप्त्या
- Opposit words
- शाळेतील मुलांसाठी बोध कथा - mp3
- विद्यार्थी फोटो
- सर्वात मोठे
- विविध शाळेतील ज्ञानरचनावादी फरशी स्टक्चरची छायाचीत्रे
- विभाज्यतेच्या कसोटय़ा
- म्हणी -६२४
- अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
- डॉ. कलामयांचे जीवनउपयोगी --१० नियम
- जयंती/पुण्यतीथी
- पुस्तके व त्यांचे लेखक
- सरांना पालकाचे पत्र
- समानार्थी शब्द-मराठी
Monday, 27 January 2020
Sunday, 7 October 2018
मुलांना काय घडवताय
*मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?*
माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.
बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.
आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.
पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.
कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.
बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.
आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.
पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.
कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
Tuesday, 14 August 2018
Monday, 2 October 2017
Tuesday, 15 August 2017
जय हिंद
🚩🇮🇳॥ वन्दे माँ भारती ॥🇮🇳🚩
🇮🇳
जय वन्दे माँ~जय माँ भारती ,
माँ~माँ मै तेरी उतारू आरती ।
मिलेंगे सौ जनम चरणों में तेरे !
फिर भी नही उपकार की पूर्ती ।।धृ।।
🇮🇳
पुजा में झिलमिल सितारे लाऊ ,
क्षितिज सूरज का दिया बनाऊ ।
पूनम चांद तिलक भाल लगाऊ ,
गले में सतरंगी इंद्रधनू पहनाऊ ।
माँ भारती जब हो तेरी आरती ,
आयेंगी भक्तों की सागर भरती ।।१।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ शानसे सिंह पे तुमे बिठाऊ ,
दौड़में चितेकी रफ़्तार दिलाऊ ।
सिरपे मोरपंखी मुकूट पहनाऊ ,
कोयल गलेसे भजन गीत गाऊ ।
जय माँ~जय माँ~जय भारती ,
खुशियों में नाचे आसमां धरती ।।२।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ भारती माँ गंगाजी में नहाये ,
पग से गंगाजल पावन हो जाये ।
माँ तेरी तिरंगी मखमली चुनरी ,
गगन में वायु संग सदा लहराये ।
हम हिन्दुस्तानी उतारेंगे आरती ,
माँ भारती है भारत की सारथी ।।३।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
हिरेमाणिक मोतीमणी पहनाऊ ,
चहुंओर कस्तूरी सुगंध फैलाऊ ।
माँ भारती तेरी मै महिमा गाऊ ,
तेरे चरण में सदा शिश झुकाऊ ।
शुर विर संतानों की है ये धरती ,
भारतके शेर करे माँ की आरती ।।४।।
मिलेंगे सौ जनम.....!
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Monday, 7 August 2017
बहिण
〰〰?〰〰
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄
Wednesday, 26 July 2017
कारगील विजय दिवस
कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारत के लिये एक महत्वपूर्ण दिवस है। इसे हर साल 26 जुलाई को मनाया जाता है। कारगिल युद्ध लगभग 60 दिनों तक चला और 26 जुलाई को उसका अंत हुआ। इसमें भारत की विजय हुई। इस दिन कारगिल युद्ध में शहीद हुए जवानों के सम्मान हेतु मनाया जाता है।
1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।
1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।
Wednesday, 14 June 2017
स्कूल चले हमस्कूल चले हम
स्कूल चले हमस्कूल चले हम
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
Monday, 12 June 2017
*येतील चिमण पाखरं'*
*येतील चिमण पाखरं'*
26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।
26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।
Subscribe to:
Posts (Atom)







